१३/६/२०१९
सत्र २५- मुकुल आव्हाड
पुस्तक - उज्ज्वल उद्यासाठी
लेखक - बाबा आमटे
"श्रम ही हैं श्रीराम हमारा" म्हणत घामाचे सिंचन करणाऱ्या रुग्णाइतांना श्रमातून भांडवलाची निर्मिती कशी करता येते याचा एक पदार्थपाठ बाबा आमटे यांनी सिद्ध केला.प्रत्येक पराभूत परिस्थितीत विजयाचा गर्भ कुठेतरी असतोच. पराभव पटकन विसरणे हे युवाशक्तीचे लक्षण आहे. समाजामध्ये परिवर्तनाचे बीज हे युवाशक्ती रोवू शकते असा आत्मविश्वास बाबांना होता. लोकांच्या उज्वल उद्यासाठी आज ची आहुती देण्याला सिद्ध असणारे तरुण पुढे सरसावले पाहिजेत त्यातून "एकात्म भारताची" संकल्पना साकार करण्यासाठी गरज आहे ती कार्यक्रमाने भरलेला पाणीदार आशावाद निर्माण करण्याची या विचारातून उमटलेलं पुस्तक " उज्वल उद्यासाठी "
No comments:
Post a Comment