सत्र १२४ - जयंत कुलकर्णी
विषय- कैफी आजमी - कवी आणि कविता
काही कवी हे काळाच्या आणि भौगोलिक सीमासुद्धा सहज पार करून जातात. त्यांच्या प्रभावाला राष्ट्रीयतेच्या भिंती अडवून ठेवू शकत नाहीत. कैफी आजमी हे त्यातलंच एक नाव. त्यांचं कम्युनिस्ट असणं - आपण पाकिस्तानला जायला हवं अशी सुरुवातीला त्यांची भूमिका असणं त्यांचं भारतापासून जोडणं रोखू शकलं नाही. शहरी नक्षलवादावर प्रकाश टाकणाऱ्या बुद्धा इन ट्रॅफिक जॅम या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांच्या गीताचा समावेश सहज पणे झाला. आणि JNU आंदोलनात हम देखेंगे सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकली असेल. यातच त्यांच्या कवितांचं मोठेपण सिद्ध होतं. पद्मश्री कैफी आजमी यांच्या कविता क्रांतिकारी आहेत तशा हळव्या सुद्धा. त्यांचे जीवन आणि त्यांच्या कविता यावर आजचं सत्र होतंय. अभ्यासपूर्ण आणि बहुआयामी मांडणी करणारे जयंतराव कुलकर्णी आजचं सत्र घेत आहेत.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment