१६-०७-२०२०
सत्र ८०- डॉ. अभिजीत फडणीस
विषय : आत्मनिर्भर भारत : शक्याशक्यता व जागतिकीकरण
मोदींनी निवेदन केल्यापासून चर्चेत असणारा आत्मनिर्भर भारत हा विषय अनेक अंगांनी समजून घ्यावा असा. उद्याच्या समर्थ भारताचं स्वप्न पाहायचं तर आज चा भारत काय आहे हे समजून घ्यावं लागतं.. केवळ इतर देशांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालून भागत नाही तर आपलं उत्पादन तेवढं समर्थ बनवावं लागतं... उत्पादक वर्गाचा आणि श्रमांचा अभिमान बाळगणारी समाज व्यवस्था निर्माण करावी लागते. संशोधन पूरक अशी व्यवस्था निर्माण करावी लागते... ही वर्ष सहा महिन्यांची नव्हे तर काही दशकांची नीती असावी लागते.आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आवश्यक असलेलं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय चिंतन मांडणार आहेत डॉ. अभिजीत फडणीस. आपल्या मृदू स्वभावासाठी आणि परखड विश्लेषणासाठी डॉ. अभिजीत फडणीस प्रसिद्ध आहेत.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment