Wednesday, December 8, 2021

सत्र ७६ - जयवंत कोंडविलकर - ओळख आपल्या ईशान्य भारताची

१८-०६-२०२०

सत्र ७६

विषय : ओळख आपल्या ईशान्य भारताची

वक्ते : जयवंत कोंडविलकर 

बाबा आमटे म्हणाले होते की राहवत नाही म्हणून काम केले पाहिजे. माणसाला कार्यरत करते ती भावना. बुद्धी फार तर दिशा देईल, परंतु देशाबद्दलची भावनाच कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने बळ देत असते. आजचं आपलं शब्दांगण म्हणजे ईशान्य भारतात तेही अगदी सीमेलगत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं अनुभव कथन आहे. ख्रिस्ती धर्मांतर आणि  दहशतवाद याच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी शाळा चालविणारे जयवंत कोंडविलकर यांचा प्रवास थक्क करणारा.... संघ विचारांचं बीज खोलवर रुजलं की काय काय करून घे शकतं याचा प्रात्यक्षिक देणारा. देशाशी जनतेला आणि मुलांना जोडायचंय हा विचार कृतीत आणताना सामोरी येणारी आव्हानं यावर भाष्य करणारं आजचं शब्दांगण चुकवू नये असंच.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...