सत्र १२२ - मुकुल आव्हाड
पुस्तक - गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा
लेखक - रावसाहेब कसबे
गांधी म्हणजे त्यांच्या चरित्रकरांना पडलेलं कोडं. देशासाठी महात्मा , टिकाकारांसाठी दुरात्मा , सामान्य जनांसाठी आणि दीनदुबळ्या लोकांसाठी "संत". वेळोवेळी गांधींच्या विचारांनी लोकांना "सर्वोदय" जगण्याचा मार्ग दाखवला आणि भविष्याकडे वाटचाल करताना हात दिला.
पण महात्मा शेवटी सामान्य माणूसच असतो. त्याच्या कर्तृत्वाने जसा इतिहास रचलेला असतो तसेच काही न सोडवलेले प्रश्न सुध्दा निर्माण झालेले असतात.
सत्याग्रहाचा मार्ग जगाला दाखवणारा हा माणूस " पराभूत " राजकारणी आणि "विजयी " महात्मा कसा झाला ?
गांधींचे काही असेच अज्ञात पैलू ह्या सत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहेत.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment