२४।११।२०२२
सत्र १९८ वे:
विषय : १८५७चा उठाव - स्वातंत्र्यसमर, जिहाद की सत्तासंघर्ष (उत्तरार्ध)
सादरकर्ते : चैतन्य जोशी
आजचं शब्दांगण चं सत्र मागच्या सत्राचा उत्तरार्ध आहे. मागच्या सत्रात चैतन्यने १८५७ च्या उठावाचा विस्तार, त्यातल्या घटना, त्यात सहभागी झालेले राज्यकर्ते, त्यांच्या भूमिका आणि त्यात सापडणारी संगती / विसंगती यांचा आढावा घेतला. आज च्या सत्रात आपला मूळ प्रश्न '१८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यसमर , जिहाद की सत्तासंघर्ष ' या प्रश्नाचा उलगडा होणार आहे. नानासाहेब पेशव्यांच्या सहभागाविषयी आपण काही वेगळ्याच गोष्टी मागच्या सत्रात ऐकल्या. त्यामुळे आजच्या सत्रातही याबद्दल काय मांडणी चैतन्य करतोय याची उत्सुकता आहे. तुम्हालाही असेल. नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment