१३।१०।२०२२
सत्र १९२ वे:
विषय : महाभारत कालनिर्णय (पूर्वार्ध)
सादरकर्ते : वासुदेव कोल्हटकर
आजचं शब्दांगण अगदीच खास ... महाभारत हा आपल्या संस्कृतीचा मानबिंदू. महाभारत हा इतिहास होता की केवळ महाकाव्य होतं असा प्रश्न पडण्याचं कारणच नाही. पण
महाभारताचा काळ म्हटलं की दोन विषय सहजच समोर येतात. 1. महाभारत या ग्रंथाचा रचनाकाळ
2. महाभारत या कथेचा काळ.
आजचं सत्र हे या दुसर्या मुद्द्यावर आहे. महाभारतात मांडल्या गेलेल्या खगोलीय स्थितीवरून नक्की कथा नक्की कोणत्या काळात घडली हे मांडता येते. यावर आजचं आणि पुढचं सत्र होईल. इतर अभ्यासकांची मते तर विचारात घेतली जातीलच पण स्वतःचा विशेष अभ्यास असलेले वासुदेव कोल्हटकर यावर आपली मते सुद्धा मांडणार आहेत. स्वाभाविकच ही सत्रे अधिक जिवंत असतील. वासुदेव कोल्हटकर आपल्या सप्रमाण मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत. आजचं सत्र नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment