Saturday, November 12, 2022

सत्र १९३ : महाभारत कालनिर्णय (उत्तरार्ध) : वासुदेव कोल्हटकर

२०।१०।२०२२

सत्र १९३ वे:

विषय : महाभारत कालनिर्णय (उत्तरार्ध)

सादरकर्ते : वासुदेव कोल्हटकर 



मंडळी, आजच्या शब्दांगणच्या सत्राची आठवण करून द्यायला हा संदेश. मागच्या सत्रात वासुदेव कोल्हटकरांनी कालगणना - त्यावरचे समज गैरसमज अशा विषयांवर चर्चा केली. आज सत्राचा उत्तरार्ध - पण खरे तर मुख्य भाग संपन्न होईल. महाभारताचा काळ नक्की कोणता असावा आणि त्याबद्दल आज प्रचलित असलेली मत - मतांतरांचा विचार आजच्या सत्रात होणार आहे. मागचे सत्र एका अर्थाने तांत्रिक असूनही रंजक झाले होते. आजच्या सत्रात तर प्रत्यक्ष महाभारत कधी घडले याचा काळ नक्की कोणता यावर चर्चा होईल. आपण सर्वांसाठीच महाभारत हा औत्सुक्याचा विषय आणि आपल्या संस्कृतीचा मानबिंदू. रामायण - महाभारत कधी घडले यावर आपल्या सभ्यतेचे अस्तित्व किती जुने आहे हे ठरते.  त्यामुळे आज ही काल निश्चिती कशी करणार याविषयी औत्सुक्य आहेच. आजचं नक्की सत्र ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...