०६ ।०७।२०२३
सत्र २३०वे:
विषय :आषाढस्य प्रथम दिवसे
सादरकर्ते : नीरज दांडेकर
नमस्कार !
नुकताच पावसाळा लागलाय. म्हणजे खरोखरच पाऊस नुसता लागून राहिलाय. बरसणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणी जागृत करतो. यात
गतभेटीच्या स्मृती असतात तर कधी
भेटीची आतुरता असते तर कधी विरहाची व्याकुळता.
पाऊस, ढग नि विरह हे तिन्ही एकत्रितपणे वाचल्यावर साहित्यप्रेमींना हटकून स्मरते यक्षाची विरहातील कविता-काव्य म्हणजेच संस्कृत साहित्यातील अजरामर कलाकृतींपैकी कालिदासाचे मेघदूत.
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कवींनी याचे रुपांतर मराठीत करून मराठी वाचकांची खूप मोठी सोय केलेली आहे.
विक्रमादित्य राजाच्या दरबारात राजकवी असलेला कालीमातेचा भक्त कालिदास. हाताच्या बोटाला अनामिका हे नामाभिधान प्राप्त होण्यास कारण कालिदास. अश्या व याहूनही काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ऐकायला व संस्कृत काव्याविषयी जाणून घेऊ या आजच्या शब्दांगणच्या सत्रात.
नुकत्याच सुरू झालेल्या आषाढ मासाचे औचित्य साधून आज गुरुवारी शब्दांगणचे सत्र *आषाढस्य प्रथम दिवसे* सादर करतायत आपल्या सर्वांना संस्कृत व मराठी काव्याचे एक व्यासंगी म्हणून परिचित असलेले श्री. नीरज दांडेकर.
तर मग अशा महाकवीचे स्मरण आणखी चिरस्मरणीय करायला सत्राला प्रत्यक्ष उपस्थित राहून कालिदासप्रेमींमध्ये सामील व्हा.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment