०६।०४।२०२३
सत्र २१७वे:
विषय : भारताच्या आर्थिक विकासासाठी सक्षम पेटंट प्रणालीची उभारणी
सादरकर्ते : निलेश पावसकर
आपले आजोबा कितीही उंच असले तरी आपली उंची आपल्यालाच गाठायला लागते. अशा अर्थाची एक म्हण आहे.
भारताचा इतिहास आणि परंपरा कितीही वैभवशाली असला तरी आजचा भारत समर्थ बनवायचा असेल तर आजचे सामर्थ्याचे निकष समजून घ्यायला हवेत आणि त्यानुसार आपली मार्गक्रमणा ठरायला हवी.
उद्याचं शब्दांगण चं सत्र खूप महत्त्वाचं यासाठी आहे की ते आजच्या भारताला सामर्थ्यशाली बनवण्याचा विचार करतं. पेटंट च्या माध्यमातून भारतीय संपत्ती भारतात राहावी आणि इतरत्रही निर्माण होणाऱ्या संपत्तीचा भारतात ओघ यायचा असेल तर
आपल्याला जाणीवपूर्वक बौद्धिक संपदेचा वापर करायला हवा...
या विषयाला वाहून घेत एक उच्च विद्याविभूषित युवक वेगळ्या अर्थाने संन्यस्त जीवन जगतो. निलेश पावसकर या समर्पित व्यक्तीचे प्रभावशाली विचार ऐकायला उद्याच्या शब्दांगण सत्राला प्रत्यक्ष उपस्थित राहावे ही विनंती.
आपल्या समूहात अनेक जण असे आहेत जे आपल्या वर्तुळात प्रभावशाली आहेत. आपण हा विषय समजून घेतलात तर समाजात त्यादृष्टीने प्रबोधन होईल...विशेषतः जे प्रतिभावान तरुणांबरोबर काम करतात, जे अध्यापन क्षेत्रात शालेय अथवा महाविद्यालयीन स्तरावर काम करतात त्या सर्वांनी तर नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment