१५।०६।२०२३
सत्र २२७वे:
विषय : शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य
सादरकर्ते : प्रशांत रावदेव
शिवराज्याभिषेक ही जगाला प्रेरणादायी घटना. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या पार अफगाणिस्तान पासून ते आसाम पर्यंत आणि खाली दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या साम्राज्याच्या नाकावर टिच्चून, आदिलशाहीला न जुमानता महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ही साधीसुधी घटना नव्हती. संपूर्ण अरब प्रांताचे २०० वर्षात इस्लामीकरण झाले होते. भारत मात्र मुघलशाहीला पुरून उरला. आपलं स्वत्व हिंदूंनी महाराजांच्या रूपात टिकवून ठेवलं की उलट म्हणावं? महाराजांनी हिंदुत्व आणि स्वत्व टिकवून ठेवलं. अगर शिवाजी न होते, सुन्नत होती सबकी!
शिवराज्याभिषेक ही म्हणून एक प्रेरणादायी घटना...
अभक्तांचा क्षयो झाला .... आनंदवन भुवनी!
*शिवराज्याभिषेकाला ३५०* वर्षे यंदा पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने *इतिहास संकलन समितीचे श्री. प्रशांत रावदेव* आजचं सत्र घेणार आहेत. नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment